खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

धुळे रोडवर पाचपावली चौकात गतिरोधक बसवून होणारे अपघात टाळा : शितल देशमुख

अमळनेर(प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या धुळे रस्त्याचे  नूतनीकरण झाल्याने वाहनधारक सुसाट जात आहेत. त्यामुळे पाचपवली देवी मंदिराजवळ दररोज अपघात होत असल्याने याठिकाणी तातडीने गतिरोधक बसवून अपघात टाकावेत, अशी मागणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष शितल देशमुख यांनी केली आहे.
धुळे रस्त्याचे रस्ता नुतनीकरण झाल्याने सर्वच वाहनांचा वेग कमालीचा वाढून वेगावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे पाच पावली देवी मंदिराजवळील चौकात प्रचंड वर्दळ राहत असल्याने आणि हा रस्ता मुख्य बाजारपेठेकडे जाणारा असल्याने याठिकाणी धुळे रस्त्यावरून सुसाट धावणारी वाहने अनेकांना इजा पोहोचवीत असून अनेक दुचाकीधारक स्वतःलाही दुखावत करून घेत आहेत,खरेतर या नवीन रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक लावणे आवश्यक आहेच. मात्र पाचपावली चौकात तातडीने सर्व बाजूने गतिरोधक लावणे गरजेचे असून अन्यथा अपघातांची मालिका सुरूच राहून याठिकाणी मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे,यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,नगरपालिका आणि संबंधित ठेकेदाराने याची तातडूने दखल घ्यावी, अशी मागणी शितल देशमुख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button